पक्ष शिस्त संघ भावना व परस्पर सहकार्य या त्रिसूत्रीवरच आगामी निवडणुकांना सामोरे जाणार – आ.मंगेशदादा चव्हाण
जळगाव [ प्रतिनिधी ]..
भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची संघटनात्मक जिल्हा बैठक आज दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी भाजपा जळगाव जिल्हा कार्यालय, जी.एम.फाउंडेशन, जळगाव येथे उत्साहात संपन्न झालेल्या. या बैठकीत सेवा पंधरवाडाचे प्रदेश सहसंयोजक आ.मा.मंगेशदादा चव्हाण यांनी सेवा पंधरवाडा कार्यक्रमाविषयी माहिती दिली. तसेच आगामी निवडणुका लक्षात घेता त्यांनी आपल्या मार्गदर्शनात कार्यकर्ते व पदाधिकार्यांना पक्ष शिस्त संघ भावना व परस्पर सहकार्य या त्रिसूत्रीवरच आगामी निवडणुकांमध्ये काम करायचे आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ना.मा. गिरीषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात पक्ष संपूर्ण शक्तीने पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे हि यावेळी नमूद केले.
या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खा. स्मिताताई वाघ यांनी कार्यकर्त्यांनी सातत्याने पक्षाचे काम करीत राहिले पाहिजे. राजकारणात संधी मर्यादीत असल्या तरी योग्य व्यक्तीला योग्य वेळी संधी देण्याचे काम भारतीय जनता पार्टी मध्ये होत असते. ज्यांना संधी मिळाली नाही. त्यांचाही विचार आगामी काळात पक्ष नेतृत्व निश्चितपणे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांस्कृतिक राष्ट्रवाद, राष्ट्र प्रथम, एकात्म मानवतावाद, सकारात्मक सर्वधर्म समभाव, अंत्योदय, मूल्य आधारित राजकारण या भाजपच्या विचारधारेवर गाढ विश्वास ठेवून काम करायचे आहे, असे सांगितले.
भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याची संघटनात्मक बैठकीत राज्य परिषद सदस्यांचा सन्मान करण्यात आला. नवीन जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्षांना नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा आरक्षण संदर्भात घेतलेल्या निर्णयासाठी अभिनंदनाचा ठराव राष्ट्रीय परिषद सदस्य मा. श्री. पोपटतात्या भोळे यांनी मांडला. या प्रसंगी मा.आ. महेंद्रसिंगबापू पाटील व मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बैठकीत जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. सेवा पंधरवाडा सप्ताह कार्यक्रम नियोजनाची माहिती सरचिटणीस श्री. कपिल पाटील यांनी दिली. सोशल मिडिया अॅप्पची माहिती सरचिटणीस कन्हैया रायपूरकर यांनी दिली. बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस श्री. अमोल नाना पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन सरचिटणीस श्री. राजेंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्षा सौ. मनोरमाताई पाटील यांनी केले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष मा.श्री दीपक सूर्यवंशी, मा.सौ. वैशालीताई सूर्यवंशी, मा.श्री. अमोलभाऊ शिंदे सर्व राज्य परिषद सदस्य, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष उपस्थित होते.
Post a Comment