नंदगांव लड़गांव ग्राम पंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन् ? लाडगाव येथील जल कुंभाची सुरक्षा वाऱ्यावर.. गावातील रिकामटेकडे मुलं चढतात पाण्याच्या टाकीवर...
अमळनेर { प्रतिनिधी }..
अमळनेर तालुक्यातील लाडगाव नांदगाव यांची ग्रुप ग्रामपंचायत असून दोघ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी लाडगाव येथे जल कुंभाची निर्मिती केलेली आहे. त्या जल कुंभामुळे दोघं गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. दररोज पाणीपुरवठा नित्याने होतो परंतु जलकुंभाची कोणत्याही प्रकारे सुरक्षा घेतली गेलेली नाही. त्या जलकुंभाच्या लोखंडी जिन्याच्या साह्याने कोणीही पाण्याच्या टाकीवर चढतात. तेथे केव्हाही घात, पात, अपघात, किंवा पिण्याच्या पाण्यात विष प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका वर्तवली जात आहे. कोणी माथे फिरू त्या जलकुंभावर चढून नसते उपदव्याप करू शकतो किंवा चढताना , उतरताना पाय सटकला तर कोणतीही जीवित हानी नाकारता येत नाही. असे जाणकारांचे मत आहे. त्या जलकुंभाला तार कुंपण किंवा संरक्षण भिंतीची मागणी अनेक दिवसापासून आहे. परंतु ग्रामसेवक यांना त्याचे गांभीर्य दिसून येत नाही. त्यांना करता टाकीच्या लोखंडी जिण्याला लोखंडी गेट अथवा तार कंपाऊंड किंवा संरक्षण भिंत करून मिळावी अशी नागरिकांची मागणी आहे.
Post a Comment