ad headr

Powered by Blogger.

राष्ट्रीय किसान मोर्चा आयोजित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील आमदारांना घेराव





राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व माननिय आमदारांना घेराव आंदोलन करून निवेदन देण्यात आले. भडगाव-पाचोरा चे आमदार माननीय किशोर पाटील यांना देखील भडगाव-पाचोरा राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने प्रांत कार्यालय पाचोरा येथे निवेदन देण्यात आले. 



यामध्ये शेतकऱ्यांच्या संबंधित विविध मागण्या आहेत. शेतीमालाला हमीभाव देणे, निर्यात बंदी लागू न होणे, पीक पंचनामा त्वरित होऊन त्वरित खर्चाची रक्कम मिळणे या सोबतच अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. माननीय आमदार किशोर पाटील यांनी देखील या विषयावर प्रश्न उपस्थित करून मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले. 




निवेदन देताना राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंडित पाटील,भगवान शिंदे,देविदास राठोड, रफीउद्दिन शेख,योजना ताई पाटील,मनीषा पाटील,विकास भिल, संजय भिल, विनोद पगारे,जगदीश शिंदे, नंदलाल आगारे,विनोद अडकमोल,सचिन पाटील,मधुकर पाटील, एड.रणजीत तडवी, सचिन पैठणकर,राहुल निकम,सुभाष राठोड राजेंद्र निकुंभ,सचिन भिल, प्रकाश मालचे, जगदीश बोरसे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments