प्रभाग क्रमांक एक आणि दोन ला नगरपालिका मधून वर्ग करून ग्रामपंचायतीचा स्वतंत्र दर्जा मिळावा.. संतप्त रहिवासी नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फळणवीस यांना देणार निवेदन.
अमळनेर{ प्रतिनिधी }. नगरपालिका प्रशासनातील प्रभाग क्रमांक एक अर्थात साने नगर न्यू प्लॉट तांबेपुरा परिसर हा अनेक वर्षापासून अनेक समस्यांनी ग्रस्त असून प्रशासनातील कोणीही जबाबदार अधिकारी प्रभाग क्रमांक एक आणि दोन कडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. नागरिकांच्या समस्यांचा पाढा दिवसा गणिक वाढत चालला असून त्यापेक्षा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिक विकास कामांचा निधी प्राप्त होत असतो. परिसरात रस्ते गटारी आणि पिण्याच्या पाण्याचा मोठ्या समस्या उद्भवल्या असून तेथे आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत. अनेक निवेदन आणि सूचना दिल्यानंतर सुद्धा प्रशासक कधीच तांबेपुरा साने नगर न्यू प्लॉट परिसरात पोहोचले नाही याच्या वेदना आणि खंत नागरिकांनी बोलून दाखवल्या. अनेक ओपन प्लेसेस मध्ये काटेरी झाडे झुडप यांचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे तेथे वाढत चाललेला डास मच्छर अनेक सर्पाचा सुळसुळाट नित्याचेच झाले आहे. पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या ठीक ठिकाणी फुटलेल्या असल्यामुळे गटारीचे पाणी पाईपलाईन मध्ये असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डायरिया सदृश्य आजाराची लागण पोटदुखी ,डोकेदुखी .अशा विविध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. अमळनेर शहरातील तसेच विप्रो कंपनीतील रसायन युक्त पाणी गटारीत सोडल्यामुळे ती गटार मुख्य वस्तीतून गेल्यामुळे अनेक नागरिकांना त्यापासून अनेक आरोग्याच्या तक्रारी अनेक वर्षापासून तशाच आहेत. विप्रो कंपनी प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त जबाबदारीने ती गटार वजा नाला याला पोट गटार अर्थात अंडरग्राउंड गटार बनवावी ही नागरिकांची गेल्या 20 वर्षापासून ची मागणी तसेच धुळखात पडलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 20 जुन रोजी विप्रो कंपनीच्या नवीन प्लांट उद्घाटनासाठी अमळनेर येथे येत असून त्यांना स्थानिक नागरिकांकडून समस्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. समस्यांचे निराकरण होत नसेल तर आमच्या प्रभाग क्रमांक एक आणि दोन ला प्रशासनातून वर्ग करून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा किंवा ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी. अशी मागणी असलेले निवेदन देण्यात येणार आहे. पाच लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याचे २ जलकुंभ असून पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे प्रत्येक वेळा पाणीपुरवठा विस्कळीत होतो व नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. विजेचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. दिवसातून दोन-तीन वेळा विद्युत प्रवाह खंडित होणे हे निश्चितच मानले जाते. वायरमन ,लाईनमन ,किंवा अभियंता, उप अभियंता ,वीज पुरवठा बाबत उदासीन असताना दिसून येतात. नागरिकांच्या समस्या बद्दल त्यांना गांभीर्य नसून अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी असे निवेदनात म्हटले आहे. विप्रो कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याबाबत सुद्धा निवेदनात नमूद केलेले आहे. कदाचित मुख्यमंत्री साहेबांचा ताफा वाढवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी साने नगर ,न्यू प्लॉट, तांबेपुरा परिसर अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त असून, नागरिक स्वतःहून रस्त्यावर येण्याची कुजबुज परिसरात सुरू असल्याचे दिसून आले.
Post a Comment